टेंभुर्णी




बेंबळे रोडलगत नागोबा मंदिरजवळ असलेली वडार समाजातील स्मशानभूमी ही समस्यांच्या व असुविधेच्या विळख्यात अडकली आहे. स्मशानभूमीची अवस्था खूपच वाईट असून येथे मयतीला येणाऱ्या लोकांची असुविधा होतेय. स्मशानभूमीमध्ये लाईट कनेक्शन नाही. त्यामुळे रात्री-अपरात्री मयताचे अंत्यसंस्कार करण्यासअडचणी निर्माण होतात. संरक्षण भिंत नसल्यामुळे सर्व मोकाट जनावरे त्याठिकाणी येतात व मयताची राख इतरत्र पसरवतात. त्यामुळे मयत झाल्यानंतरचे इतर विधी करण्यास समस्या निर्माण होतात. स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक नसल्याने चारही बाजूला माती आहे. त्यामुळे पावसाळ्यात गुडघ्या एवढा चिखल असतो. प्रेत नेण्यास अडचणी येतात. तसेच त्याठिकाणी पाण्याची टाकी नसल्याने हात-पाय धुण्यासाठी लांबून पाणी मागून घ्यावे लागते. या स्मशानभुमीकङे स्थानिक पुढाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.

स्मशानभुमी दुरुस्तीसाठी यापूर्वी सोलापूरचे जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी पंचायत समिती कुर्डूवाडी, ग्रामविस्तार अधिकारी टेंभुर्णी यांना दि.२४ सप्टेंबर २०१९ रोजी निवेदन दिले होते. परंतू या सर्व अधिकाऱ्यांनी या निवेदनाल बहुतेक केराची टोपली दाखवलेली दिसतेय.

स्थानिक पुढारी व अधिकारी दुर्लक्ष करताहेत म्हणुन वडार समाजाचे युवा कार्यकर्ते प्रतिक बंडू माने यांनी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांना निवेदन दिले. जर खासदारांकङुनही स्मशानभुमीची दुरुस्ती झाली नाही तर माञ या स्मशानभुमीमध्येच सर्व समाजबांधवांसह उपोषण करणार असल्याचा इशारा प्रतीक माने यांनी दिला आहे.
header ads